या देशावर जेवढा अधिकार आपला, तेवढाच पाकिस्तनमधून आलेल्या निर्वासितांचा - गृहमंत्री अमित शहा

Thote Shubham

नवी दिल्ली :  गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कॉंग्रेसने कान उघडून नीट ऐकून घ्यावे, आम्हाला पाहिजे तितका विरोध करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देणारच. भारतावर अधिकार जितका आपला आहे तितकाच हक्क पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांचा आहे.

 

अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका मोर्चाला संबोधित करताना सांगितले की, 'आज सर्वच कॉंग्रेसवासी देशभर सीएएला विरोध करीत आहेत. महात्मा गांधी काय म्हणाले होते ते तुम्ही ऐकत नाही. महात्मा गांधींना आपण कधीच सोडले आहे.अमित शहा म्हणाले की, सीएएवर भाजप जनजागृती अभियान चालवित आहे.

 

हे जन जागरण अभियान भाजपा करीत आहे कारण कॉंग्रेस पक्ष, केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट हे सर्व एकत्र जमून देशाची दिशाभूल करीत आहेत. ते म्हणाले, "आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की सीएएमध्ये कोठेही नागरिकत्व घेण्याची तरतूद नाही, त्यामध्ये नागरिकत्व देण्याची तरतूद आहे."                                                                                                                            

Find Out More:

Related Articles: