टी-२०मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम विराटच्या नावे

Thote Shubham

हैदराबाद : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ६ गडी राखत दणदणीत विजय मिळविला. वेस्ट इंडिजच्या २०८ धावांचा पाठलाग भारताने १८.४ षटकांमध्ये ४ गडी गमावून केला. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९४ धावांची तर केएल राहुलने ६२ धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटमधला विराटचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. टी-२० क्रिकेटमधील विराटचे हे २३वे अर्धशतक होते. विराटला या कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

टी-२०मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. १२व्यांदा टी-२० क्रिकेटमध्ये विराटने सामनावीर पुरस्कार मिळवला. टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनेही १२वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. आता रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. विराटला या मॅचमध्ये मोहम्मद नबीच्या पुढे जायची संधी आहे.

 

विराट कोहलीने ७३ टी-२० सामन्याच्या डावात ६८ इनिंगमध्ये १३६.७ च्या स्ट्राईक रेट आणि ५१.९२च्या सरासरीने २,५४४ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे.

Find Out More:

Related Articles: